ज्या लेखांमुळे तसलिमांना परागंदा व्हावे लागले, ते जहाल लेखन. या पुस्तकाचे नाव 'नष्ट मेयर नष्ट गद्य'.समाजाच्या दृष्टीने मी 'नष्ट' म्हणजे 'वाया गेलेली' आहे.असे स्वतःला म्हणवून घेणे मला आवडत.कारण जी स्त्री स्वताचे दुखः ,दैन्य ,दुर्दशा दूर करायला बघते.धर्म समाज आणि राष्ट्र यांच्यातील गलिच्छ नियमांना विरोध करायला खंबीरपणे उभी राहते.तिचा अपमान करणाऱ्या गोष्टींना विरोध करते, स्वताच्या अधिकारांबद्दल जागरूक राहते.तिला समाजातील सभ्य लोक 'नष्ट' म्हणतात,हे सत्य आहे. स्त्रीला सुधारायचे असेल तर पहिले अट तिन 'नष्ट' व्हायला पाहिजे. समाजाच्या दृष्टीने 'नष्ट' झाल्याशिवाय समाजाच्या कचाट्यातून स्त्री ची सुटका होणे शक्य नाही. लोक ज्या स्त्रीला 'नष्ट' म्हणतात ,तीच खरी निकोप आणि बुद्धिमान माणूस असते. तसलीमा नासरीन.