Aanandi Manasathi (Marathi edition): Man Trast Karat Asel Tar Kay Karal

· WOW Publishings Private Limited · Narrated by Pallavi Chaudhari
4.9
20 reviews
Audiobook
5 hr 1 min
Unabridged
Ratings and reviews aren’t verified  Learn More
Want a 30 min sample? Listen anytime, even offline. 
Add

About this audiobook

वैरी मनाला मित्र कसे बनवाल

आजच्या तांत्रिक युगात अलेक्सा, सिरी, गुगल असिस्टंट अशा बोलणार्‍या मशीनद्वारे लोक गाणी, बातम्या, एखाद्याशी फोनवर बोलणे किंवा मेसेज पाठवणे अशी कार्यं सहजतया करू शकतात. पण समजा, या उपकरणात काही बिघाड झाला आणि ते सांगितलेल्या कार्यांव्यतिरिक्त इतर काहीतरी करू लागले, चुकीच्या बातम्या सांगू लागले तर काय म्हणाल? ‘तुला जितकं सांगितलंय ना तितकंच तू कर... तुला माझ्यासाठी बनवलंय, मी तुझ्यासाठी नाहीये...’ समजलं?

मन असं बोलणारं मशीन आहे, ज्याचा रिमोट मनुष्याच्या हातात आहे, परंतु तो मनाचं ऐकण्यातच मग्न राहतो. त्यामुळे मन मनुष्याची सेवा करण्याऐवजी एखाद्या वैर्‍याप्रमाणे त्यालाच आपली सेवा करायला भाग पाडतं, बोटांच्या इशार्‍यावर नाचवतं.

मात्र प्रस्तुत पुस्तकात तुम्हाला असे उपाय मिळणार आहेत, ज्याने तुमचं मन एक जिवलग मित्र बनून सदैव तुमच्या सेवेत तत्पर राहील. बघू या ते उपाय...

* कोणते प्रश्न विचारल्याने मन शांत होईल?

* कोणते विचार केल्याने मन शांत राहील?

* कोणते प्रशिक्षण मिळाल्याने मन समग्र होईल?

* मनाच्या विचार चक्राची दिशा कशी बदलावी?

* मनाला आठवणीतून मुक्त कसे करावे?

* मनातील मूळ विचार (कोर थॉट) कसे ओळखाल?

* सत्य विचारांनाच प्राधान्य कसं द्याल?

* नात्यामुळे मन त्रस्त होत असेल तर काय कराल?

* मनातील भावनांकडे कसे बघाल?

* मनामुळे त्रस्त होत असाल, तर त्यातून मुक्त होण्याचा अंतिम उपाय कोणता?

Ratings and reviews

4.9
20 reviews
Sumedh Chaudhari
August 16, 2020
Amazing book in Hindi, English and Marathi. Related to current pandemic circumstances. Good Narration. Nice Voice. Hope to hear many more books soon.
4 people found this review helpful
Did you find this helpful?
Girish Joshi
August 16, 2020
सरश्री जी के हर विचार सभी मे तेज क्रांती लाती हैं! मन को स्थिर कर के मुक्त अवस्था पाने का सरल उपाय इसमे हैं ! प्रेम आनंद मौन !
Did you find this helpful?
Rajshri D
November 13, 2020
dhanyawad
Did you find this helpful?

About the author

सरश्रींचा आध्यात्मिक शोधाचा प्रवास त्यांच्या बालपणापासूनच सुरू झाला होता. हा शोध सुरू असतानाच त्यांनी अनेक प्रकारच्या पुस्तकांचं अध्ययन केलं. त्याचबरोबर या शोधकाळात त्यांनी अनेक ध्यानपद्धतींचा अभ्यासही केला. त्यांच्यातील या जिज्ञासेने त्यांना अनेक वैचारिक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये जाण्यासाठी प्रेरित केलं. जीवनाचं रहस्य समजण्यासाठी त्यांनी प्रदीर्घ काळ मनन करून आपलं शोधकार्य सातत्याने सुरू ठेवलं. या शोधातूनच त्यांना ‘आत्मबोध’ प्राप्त झाला. आत्मसाक्षात्कारानंतर त्यांना जाणवलं, की अध्यात्माचा प्रत्येक मार्ग ज्या शृंखलेने जोडलेला आहे, तो म्हणजे ‘समज’(Understanding). आत्मबोधप्राप्तीनंतर त्यांनी अध्यापनाचं कार्य थांबवलं आणि जवळ जवळ दोन दशकांहूनही अधिक काळ आपलं समस्त जीवन मानवजातीच्या कल्याणासाठी आणि आध्यात्मिक विकासासाठी अर्पण केलं.  


सरश्री म्हणतात, ‘‘सत्यप्राप्तीच्या सर्व मार्गांचा प्रारंभ जरी वेगवेगळ्या मार्गांनी होत असला, तरी सर्वांचा अंत मात्र एकच समज प्राप्त केल्याने होतो. ही ‘समज’च सर्व काही असून ती स्वतःमध्ये परिपूर्ण आहे. आध्यात्मिक ज्ञानप्राप्तीसाठी या ‘समजे’चं श्रवणच पुरेसं आहे.’’ ही समज प्रकाशमान करण्यासाठी आजपर्यंत त्यांनी आध्यात्मिक विषयांवर तीन हजारांहून अधिक प्रवचनं दिली आहेत. या प्रवचनांद्वारे ते अध्यात्मातील अतिशय गहन संकल्पना सहज, सुलभ आणि व्यावहारिक भाषेत समजावून सांगतात. समाजातील प्रत्येक स्तरावरील मनुष्य सरश्रींद्वारे सांगितल्या जाणार्‍या या समजेचा लाभ घेऊ शकतो. 


ही समज प्रत्येकाला आपल्या अनुभवातून प्राप्त व्हावी, यासाठी सरश्रींनी ‘महाआसमानी परमज्ञान शिबिर’ आणि त्यासाठी आवश्यक असणारी कार्यप्रणाली (सिस्टिम) तयार केली. तिचा लाभ आज लाखो लोक घेत आहेत. या प्रणालीला आय.एस.ओ. (ISO 9001:2015) प्रमाणपत्रही लाभलंय. या प्रणालीमुळेच अनेकांना सत्यमार्गावर वाटचाल करण्याची प्रेरणा मिळाली आहे. या समजेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी ‘तेजज्ञान फाउंडेशन’ या आध्यात्मिक संस्थेचा पाया रचला. ‘हॅपी थॉट्सद्वारे उच्चतम विकसित समाजाची निर्मिती करणे,’ हेच या संस्थेचं मुख्य उद्दिष्ट आहे. 


विश्वातील प्रत्येक मनुष्य आज सरश्रींच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊ शकतो. त्यासाठी कोणत्याही धर्म, जात, उपजात, वर्ण, पंथ वा लिंग यांचं बंधन नसतं. विश्वाच्या प्रत्येक कानाकोपर्‍यांतील लोक आज ‘तेजज्ञान’च्या अनोख्या ज्ञानप्रणालीचा (System for Wisdom) लाभ घेत आहेत. याच व्यवस्थेचा आणखी एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे, दररोज सकाळी आणि रात्री 9 वाजून 9 मिनिटांनी लाखो लोक विश्वशांतीसाठी प्रार्थना करत आहेत.


बेस्ट सेलर पुस्तक ‘विचार नियम’ शृंखलेचे रचनाकार म्हणूनही सरश्रींना ओळखलं जातं. केवळ पाच वर्षांच्या कालावधीत या पुस्तकाच्या 1 कोटीपेक्षा अधिक प्रती वितरित झाल्या आहेत. याशिवाय आजवर त्यांनी विविध विषयांवर 150 हून अधिक पुस्तकं लिहिली आहेत. त्यांपैकी ‘विचार नियम’, ‘स्वसंवाद एक जादू’, ‘शोध स्वतःचा’, ‘स्वीकाराची जादू’, ‘निर्णय आणि जबाबदारी’, ‘निःशब्द संवाद एक जादू’, ‘संपूर्ण ध्यान’ इत्यादी पुस्तकं बेस्ट सेलर झाली आहेत. ही पुस्तकं दहापेक्षा अधिक भाषांमध्ये अनुवादित असून, पेंगुइन बुक्स, हे हाउस पब्लिशर्स, जैको बुक्स, मंजुळ पब्लिशिंग हाउस, प्रभात प्रकाशन, राजपाल अ‍ॅण्ड सन्स, पेंटागॉन प्रेस आणि सकाळ प्रकाशन इत्यादी प्रमुख प्रकाशन संस्थांद्वारे ती प्रकाशित झाली आहेत. 

Rate this audiobook

Tell us what you think.

Listening information

Smartphones and tablets
Install the Google Play Books app for Android and iPad/iPhone. It syncs automatically with your account and allows you to read online or offline wherever you are.
Laptops and computers
You can read books purchased on Google Play using your computer's web browser.

Listeners also liked

More by Sirshree

Similar audiobooks